माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी


शरीरावर खोचलेले तीक्ष्ण बाण,
छिन्नविच्छिन्न झालेला स्वाभिमान..

डोळ्यासमोर गर्द अंधार आणि काळेकुट्ट आभाळ,
उपटून काढ बाण नि होऊ दे काया रक्तभांबाळं..


वाहूदे त्या लाल रंगाला मनसोक्त,
धमन्या ही होऊदेत अशक्त..

ना ओढायला वस्त्र ना आडोशाला छत्र,
कमजोर पडू नको देऊस मन तुझे मात्र..

उठ मर्दा, घे भरारी उंच आकाशी,
प्रतिज्ञा कर नाही ठेवणार बायको पोरं उपाशी..

अरे नको उपकार, नको कुणाची मेहेरबानी,
परिस्थितीशी लढ जो पर्यंत शरीरात थेंबभर पाणी..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर